रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ४० बॅगा शिल्लक

सध्या सर्दी, खोकला, तापसरी याचबरोबर डेंग्यूसारखे आजारही वाढले असल्याने गंभीर रूग्णाला जिल्हा रूग्णालयात दाखल करावे लागते. प्रसुतींची संख्या वाढली आहे, अपघातांमध्ये गंभीर होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीतून प्रसूतीसाठी येणाऱ्या माता, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, आर्थिक दुर्बल, हिमोफिलीया, थॅलिसिमिया सारख्या आजारग्रस्त रूग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे या रूग्णालयाच्या रक्तपेढीची गरज वाढली आहे. रक्तपेढीतर्फे रक्तदात्यांची यादी तयार […]